Philosophy

तो: hi there! कुठे होतीस इतके दिवस?
मी: इथे-तिथे होते... अशा-तशा गोष्टी करत होते...
तो: वा छान! केवढी information दिलियेस!
मी: heeheee बरं, सांग तू काय केलंस इतक्या दिवसात?
तो: भटकंती, लुख्खेगिरी, खूप काम आणि खूप कमी बडबड!
मी: कमी बडबड? That's not your style! ... बरोबर, मी नव्हते ना... कोणाशी बोलणार होतास मग तू?
तो: अगदीच..किती बरं वाटत होतं मला.. वायफळ बडबड न करता किती तरी जास्त वेळ चांगल्या कामात घालवला मी.
मी: खडूस! एवढं काम-धाम करून तरी काय साध्य करणारेस? काम करून करून मरून जाशील एक दिवस, मग कळेल!
तो: मरून गेल्यावर काय कळणारे येडपट? जे काय कळेल ते आत्ताच कळेल ना?
मी: का? तुला नाही वाटत, मरून गेल्यावर काहीतरी भलं व्हावं तुझं म्हणून?
तो: हो वाटतं ना.. मरून मग पॅरीस च्या रस्त्यावर 7 course dinner करावा, stylish कपडे घालावेत, पोरींना पटवावं.. असं सगळं वाटतं मला..heehee
मी: आचरटच आहेस, हे तर सगळं आत्ताच करू शकशील की. म्हणजे अगदी पॅरीस नाही तरी M. G. Road ला 3 course dinner मिळेल, stylish कपडे ही तिथे रस्त्यावर मिळतील आणि पोरी तर तुला आत्ताही पटणार नाहीतच मग तुझं भयंकर भूत झाल्यावर कुठून पटायच्यात?
तो: मग काय तर! तूच हा आचरट विषय काढलास..म्हणे मेल्यानंतर काय?
मी: अरे म्हणजे तुझ्या आत्म्याचं कसं होईल असा विचार नाही करत का तू? म्हणजे बघ, परवा मी एक भजन ऐकलं, त्यात असं म्हटलं होतं की आत्ता तुम्ही जे जगताय ते तुमचं आयुष्य एक temporary state आहे, पण तुमचा आत्मा अमर आहे त्यामुळे तुम्ही असं वागलं पाहिजे की तुमच्या आत्म्याचं बरं होऊ शकेल काहीतरी.
तो: अच्छा असं झालंय का तुमचं? तरीच म्हटलं एवढं philosophical वारं का वाहू लागलंय!
मी: हल्ली मी असे विचार करायला लागले आहे, येऊन-जाऊन ६०-७० वर्षांचंच आयुष्य असतं ना आपलं? म्हणजे त्या आधी चुकून मेलो नाही तर! मग त्यानंतर काय, असा विचार येतोच.
तो: त्या नंतर काही असायला हवंच आहे का?
मी: काय माहीत, एवढा सगळा पसारा माणसांनी मांडल्यानंतर असं वाटू शकतंच ना, नंतर काहीतरी असेलंच म्हणून. नसेल तर मजा नाही काही. "मी" नावाच्या entityचं काय होईल मग?
तो: हं.. म्हणूनच ती temporary state ची philosophy आली असावी. प्रत्येक माणसाला ही भिती सतावत असेलंच, फक्त ७० वर्षं आहेत आणि त्यानंतर "the end", म्हणजे एवढी मरमर केली अयुष्यात त्याला काही अर्थंच नाही + मी मी म्हणून जी गोष्ट जगवली, विचार-मतं-materialistic गोष्टिंनी सजवली ती नाहीशी होणार! त्यातूनंच कदाचित आत्म्याची concept आली असावी, अशी एक eternal वस्तु जी unique आहे, तुमचं शरीर जे मरून जाईल (हे philosophically नाकारता येणं शक्यंच नाही म्हणून accept करावं लागलं असेल बहुतेक) त्यात temporarily राहणारी पण eternal nevertheless...
मी: म्हणजे फक्त काल्पनीक गोष्ट आहे ही? आत्मा वगैरे असं काही नसतंच?
तो: कोणास ठाउक? असेलही किंवा नसेलही, मात्र एक गोष्ट नक्की, आपल्याकडे काही वर्षं आहेत आपल्या मालकीची, त्यात आपण स्वप्नं बघु शकतो, कमाल music ऐकू शकतो, चित्रं काढू शकतो, programming करू शकतो... हे सगळं करून घ्यावं तुका म्हणे!
मी: हो हो हे चांगलंय असंच करू या!
तो: हो की नाही? but I sincerely hope की मेल्यानंतरचं आयुष्य वगैरे अशी काही गोष्ट नसावी... नाहीतर तेव्हाही येऊन तू भलते भलते प्रश्न विचारलेस तर मात्र मला आत्महत्या करण्याचा पर्यायही नसेल! heeheheee
मी: तु नेहमीच useless आहेस, अगदी eternally!!!!

6 comments:

संवादिनी said...

छान वाटला संवाद. आवडला. मुळात जे सरळ सांगून थोडं बोअर होऊ शकेल, ते संवादाच्या रुपात सांगून. आणि त्याचा आणि तिचा संवाद अशा रुपात सांगून फारच अपिलिंग झालंय.

Nivedita Barve said...

Thanks a lot Samvadini :)

hemant_surat said...

फ़ारच छान!

Mandar Garge said...

manat dhavnare vicharanna sanwadrupi chan mandale aahes.

Mandar Garge said...

by the way good or bad life after death would make sense only in the context of life before death (which you dont know whether you know about after death - just the way you dont know ki gelya janmi tumhi kon hota) Tyamule koni jar tumhala asa mhanala ki 'gelya janmi tu amuk vait kele asave mhanun hya janmi tula tamuk bhogave lagat aahe' - then hya janmi milalele punya kinva paap makes no sense unless you know how you were right or wrong in your 'gelya janmi'. Konas thauk, pan kadachit asa hi asel ki he 'atme' ch chavat pana karat astil. Mhanje tyanchya ekhadhya janmi te vaiit vagale mhanun jya sharirat tyanna dhakalale jaat asave tya sharirala fukat shikdha :)

Nivedita Barve said...

@ Hemant and Mandar,
Thanks for the compliment!

@ Mandar,
Yes, this philosophy is also heard very frequently "tumchya magchya janmiche paap-punya hya janmi hi apply hota". Tu mhantos te barobar ahe, ya goshti aplyala mahit asna shakya naslyamule tya gruhit dharnyat kahi vishesh point nahi.
Ani, atmyacha funda tar beshtch...hahhaa.
Jar he atme itkya frequently sharir badalat astil tar tyanna eka particular sharirabaddal far apulki ani prem asaychi hi garaj nahi ;) Very interesting idea that.
Thanks for bringing it up!